कृषी

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाला आजपासून सुरूवात, अमरावती जिल्ह्यातील साद्राबाडी गावात होणार शुभारंभ

✍️ मुख्य संपादक श्री. नरसिंग कांबळे)

अमरावती : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाला आजपासून सुरूवात होणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून कृषिमंत्री सत्तार हे एक दिवस शेकऱ्यांसोबत राहणार आहेत. शेतकऱ्यांना शेती करताना काय अडचणी येतात. शेतकरी आत्महत्या करण्याचा मार्ग का निवडतो. या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात त्यांनी केली आहे. या उपक्रमाची सुरुवात आजपासून विदर्भातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या मेळघाटातून झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील साद्राबाडी या गावातील शेतकरी शैलेंद्र सालकर यांच्याकडे ते रात्री मुक्कामी राहिले.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील साद्राबाडी या गावातील शेतकऱ्यांनी तसेच गावकऱ्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. त्यांच औक्षण देखील केले. आज मेळघाटातील साद्राबाडी या गावातून ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. आज दिवसभर सत्तार हे प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी हे संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणार आहेत. तसेच प्रत्येकांच्या अडचणी समजून घेणार आहेत.

प्रत्येक शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणार 

सुलभ आणि प्रभावी कृषी विषयक धोरण तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न प्रशासनाने समजून घेणे, त्यावर कोणत्या उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करुन शेतकरी समस्यांचे मुळापर्यंत जाणार आहेत. त्यासाठीच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम राज्यभर राबवण्याची संकल्पना मांडली आहे. या उपक्रमांतर्गत प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष शेतावर आणि ग्रामीण भागात राहणार आहेत. त्यांच्या दैनंदिन शेतीच्या कामकाजात येणाऱ्या अडचणींवर चर्चा करणार आहेत.

आज कृषीमंत्री सत्तार यांचा कार्यक्रम कसा असेल

कृषीमंत्री सत्तार हे आज सकाळी ९ वाजता दत्तात्रय पटेल यांच्यासोबत शेतात जातील. तिथे सोयाबीन फवारणी होईल आणि त्यांच्याशी चर्चा करतील. त्यांनतर बाजूलाच असलेल्या राजेश डावलकर यांच्या शेतात कापूस डवरणी/फवारणी होईल. नंतर बाबूलाल जावरकर यांच्या शेतात विद्युत पंप दिले त्याची पाहणी आणि सोयाबीन फवारणी होईल. तिथून ते किशोरीलाल धांडे यांच्या शेतात जाऊन त्यांच्या शेतात असलेल्या संत्रा बागेची पाहणी आणि संत्र्याची छाटणी, खत देणे, फवारणी होऊ शकते. त्यांनतर नंदलाल बेठेकर यांना विहीर दिली त्याची पाहणी करतील. तिथून अशोक पटेल यांच्या शेतात ठिंबक संच पाहणी करणार आणि रामगोपाल भिलावेकर यांच्या शेतात तुषार संच पाहणी. आणि मग बाटु धांडे यांच्या शेतात रोटावेटरची पाहणी आणि नथु गाडगे यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची ते पाहणी करतील आणि मग पुरुष बचत गट यांची अवजार बँक पाहणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra